महान साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी सखोल माहिती



 महान साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी सखोल माहिती 


अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव  तुकाराम भाऊराव साठे. अण्णाभाऊ साठे हे एक लेखक, लोकशाहीर तसेच समाजसुधारक म्हणुन ओळखले जातात. अण्णाभाऊ साठे एक मांग जातीत जन्मलेले व्यक्ती होते. त्यांनी अनेक लोकनाटये, प्रवासवर्णन, कथा, कादंबरी, नाटक, शाहीरी, पोवाडे, पटकथा यांचे देखील लेखन केलेले आपणास दिसुन येते. 

आज ह्या अशा एका थोर व्यक्तीमत्वाचा आढावा आजच्या लेखातुन घेणार आहोत जसे की अण्णाभाऊ साठे यांचे राहण्याचे ठिकाण कोणते? अण्णाभाऊ साठे यांच्यावर कोणत्या विचारसरणीचा प्रभाव होता? अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या आणि कविता कोणत्या? अण्णाभाऊ साठे यांना लोकशाहीर ही पदवी केव्हा दिली गेली? अण्णाभाऊ साठे यांची जयंती केव्हा साजरी केली जाते? इत्यादी बाबींचा आपण आजच्या लेखातुन थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच याचा शालेय विद्यार्थ्यांना किती फायदा होऊ शकतो या बाबींचा विचार या लेखना अंती नक्कीच तुमच्या डोक्यात आल्याशिवाय राहणार नाही .


अण्णाभाऊ साठे यांचे भाषण

अण्णाभाऊ साठे जयंती

अण्णाभाऊ साठे फोटो

अण्णाभाऊ साठे माहिती

अण्णाभाऊ साठे बॅनर

अण्णाभाऊ साठे जयंती बॅनर

अण्णाभाऊ साठे भाषण मराठी

अण्णाभाऊ साठे पुण्यतिथी

अण्णाभाऊ साठे भाषण

अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त भाषण 

👉जीवन परिचय 

     अण्णा भाऊ साठें यांचा जीवन परिचय जाणून घेण्यासाठी ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा म्हणजे एखाद्या महान पुरुषांचे खरे जीवन कसे होते त्यानी कशाप्रकारे आपली छाप लोकांवर पाडली हे कळते .

      लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई साठे होते. साठे हे शाळेत शिकलेले नाही, केवळ दीड दिवस ते शाळेत गेले नंतर तेथील सवर्णांद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली. त्यांनी दोन लग्न केलीत, त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई साठे तर दुसरी जयवंता साठे ह्या होत. त्यांना एकूण तीन अपत्ये होती - मधुकर, शांता आणि शकुंतला.असे त्यांची नावे होती 

    मित्रांनो अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक हे त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात. संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजविण्याचे काम शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द.न. गव्हाणकर यांनी केले. मुंबईमराठवाडाविदर्भकोकणपश्चिम महाराष्ट्र तसेच सीमाभागातील अनेक ठिकाणी शाहिरांनी आपल्या लालबावटा कलापथकाचे कार्यक्रम सादर केले.


👉अण्णाभाऊ साठे यांचे राजकीय जीवन 

            अण्णाभाऊ साठे यांनी पहिल्यांदा कॉ श्रीपाद अमृत डांगे यांच्या कम्युनिस्ट विचारसरणीने प्रभावित झाले.१९४४ मध्ये दत्ता गवाणकर आणि अमर शेख या शाहिरांच्या सोबत त्यांनी लालबावटा कला पथक स्थापन केले. याद्वारे त्यांनी अनेक सरकारी निर्णयांना आव्हान दिले होते. ते १९४० च्या दशकामध्ये कार्यरत राहिले आणि तेविया अब्राम्स यांच्यानुसार, भारतातील साम्यवादाचा आधी स्वातंत्र्याच्या नंतरची "१९५० च्या दशकातील सर्वात रोमांचक नाटकीय घटना" होती. भारतीय स्वातंत्र्य्यानंतर उच्चवर्णीयांचे भारतावरील शासन त्यांना मान्य नव्हते म्हणून त्यांनी १६ ऑगस्ट १९४७ रोजी मुंबई येथे वीस हजार लोकांचा मोर्चा काढला आणि त्या मोर्च्यातील घोषणा होती, "ये आझादी झूठी है, देश कि जनता भूखी है!" इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनमध्येही ते एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व होते, जी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची एक सांस्कृतिक शाखा होती आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये, ज्याने भाषिक विभागातून वेगळे मराठीभाषी राज्य (बॉम्बे राज्य) निर्माण करण्याची मागणी केली होती.

 अण्णाभाऊ साठे यांनीं नंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणुकींना अनुसरत दलित कार्याकडे वळले आणि दलित व कामगारांच्या जीवनातील अनुभवांना प्रकट करण्यासाठी त्यांच्या कथांचा वापर केला. इ स 1958 मध्ये, बॉम्बेमध्ये स्थापन केलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात आपल्या उद्घाटन भाषणात त्यांनी म्हटले की, "पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे"[७] यातून त्यांनी जागतिक संरचनांमध्ये दलित आणि कामगार वर्गांचे महत्त्व स्पष्ट केले. या काळातील बहुतांश दलित लेखकांच्या विपरित, साठेंचे कार्य बौद्ध धर्मा ऐवजी मार्क्सवादाच्या प्रभावाखाली होते.

त्यांनी म्हटले आहे की, "दलित लेखकांना सध्याच्या सांसारिक व हिंदू अत्याचारांपासून दलितांना मुक्त करणे आणि त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. कारण दीर्घकालीन पारंपरिक श्रद्धांना त्वरित नष्ट केले जाऊ शकत नाही.


👉 अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य लेखन

       साठे यांनी मराठी भाषेत ३५ कादंबऱ्या लिहिल्या. त्यामध्ये फकिरा (१९५९) समाविष्ट आहे, जिला इ.स. १९६१ मध्ये राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आहे. साठेंच्या लघु कथांचा संग्रह १५ आहे, ज्यामध्ये मोठ्या संख्येने बऱ्याच भारतीय भाषांमध्ये आणि २७ अ-भारतीय भाषांमध्ये भाषांतरित केल्या गेल्या आहेत. कादंबरी आणि लघुकथा यांच्याव्यतिरिक्त साठे यांनी नाटक, रशियातील भ्रमंती, १२ पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीतील १० गाणी लिहिली.

साठेंच्या पोवाडा आणि लावणी यांसारख्या लोककथात्मक कथा शैलींच्या वापराने लोकांमध्ये ते लोकप्रिय बनले व त्यांचे कार्य अनेक समुदायांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या ‘फकिरामध्ये, साठेंनी आपल्या समुदायाला पूर्ण भुखमरीपासून वाचवण्यासाठी ग्रामीण रूढिवादी प्रणाली आणि ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध विद्रोह करणाऱ्या नायक फकिराला चित्रित केले. नायक आणि त्याच्या समुदायाला नंतर ब्रिटिश अधिकारी द्वारे अटक आणि छळ दिला जातो, आणि अखेरीस फकिराला फाशी देऊन ठार मारले जाते.

मुंबई मधील शहरी पर्यावरणाने त्यांच्या लिखाणावर लक्षणीय प्रभाव टाकला. त्यांनी तो डायस्टोपियन परिवाराच्या रूपात दाखवला.. त्यांनी त्यांच्या "मुंबईची लावणी" आणि "मुंबईचा गिरणीकामगार" या दोन गाण्यांतून मुंबईला 'दुर्व्यवहारी, शोषणकारी, असमान और अन्यायपूर्ण' असे म्हटले आहे.


👉अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली काही पुस्तकांची यादी

  1. अकलेची गोष्ट (लोकनाट्य, १९४५)
  2. अण्णा भाऊ साठे : प्रातिनिधिक कथा (संपादक - डाॅ. एस.एम. भोसले)
  3. अमृत
  4. आघात
  5. आबी (कथासंग्रह)
  6. आवडी (कादंबरी)
  7. इनामदार (नाटक, १९५८)
  8. कापऱ्या चोर (लोकनाट्य)
  9. कृष्णाकाठच्या कथा (कथासंग्रह)
  10. खुळंवाडा (कथासंग्रह)
  11. गजाआड (कथासंग्रह)
  12. गुऱ्हाळ
  13. गुलाम (कादंबरी)
  14. चंदन (कादंबरी)
  15. चिखलातील कमळ (कादंबरी)
  16. चित्रा (कादंबरी, १९४५)
  17. चिरानगरची भुतं (कथासंग्रह), १९७८)
  18. नवती (कथासंग्रह)
  19. निखारा (कथासंग्रह)
  20. जिवंत काडतूस (कथासंग्रह)
  21. तारा
  22. देशभक्त घोटाळे (लोकनाट्य, १९४६)
  23. पाझर (कादंबरी)
  24. पिसाळलेला माणूस (कथासंग्रह)
  25. पुढारी मिळाला (लोकनाट्य, १९५२)
  26. पेंग्याचं लगीन (नाटक)
  27. फकिरा (कादंबरी, १९५९)
  28. फरारी (कथासंग्रह)
  29. मथुरा (कादंबरी)
  30. माकडीचा माळ (कादंबरी, १९६३)
  31. रत्ना (कादंबरी)
  32. रानगंगा (कादंबरी)
  33. रूपा (कादंबरी)
  34. बरबाद्या कंजारी (कथासंग्रह, १९६०)
  35. बेकायदेशीर (लोकनाट्य, १९४७)
  36. माझी मुंबई (लोकनाट्य)
  37. मूक मिरवणूक(लोकनाट्य)
  38. रानबोका
  39. लोकमंत्र्यांचा दौरा (लोकनाट्य, १९५२)
  40. वारणेचा वाघ (कादंबरी, १९६८)
  41. वैजयंता (कादंबरी)
  42. वैर (कादंबरी)
  43. शेटजींचे इलेक्शन (लोकनाट्य, १९४६)
  • संघर्ष
  1. सुगंधा
  2. सुलतान (नाटक)

प्रवासवर्णन

  1. कविता आणि माझा रशियाचा प्रवास

काव्ये

  • अण्णा भाऊ साठे यांचे पोवाडे व लावण्या



👉अण्णाभाऊ साठे यांच्या लेखन साहित्यावर आधारित काही चित्रपट 
 
  1. वैजयंता (१९६१, कादंबरी – वैजयंता)
  2. टिळा लावते मी रक्ताचा (१९६९, कादंबरी – आवडी)
  3. डोंगरची मैना (१९६९, कादंबरी – माकडीचा माळ)
  4. मुरली मल्हारीरायाची (१९६९, कादंबरी – चिखलातील कमळ)
  5. वारणेचा वाघ (१९७०, कादंबरी – वारणेचा वाघ)
  6. अशी ही साताऱ्याची तऱ्हा (१९७४, कादंबरी – अलगूज)
  7. फकिरा (कादंबरी – फकिरा) 


👉अण्णाभाऊ साठे यांच्यावर संशोधन करून पुस्तके लिहिली गेली त्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे 


  • अण्णाभाऊंचा संदेश (विनिमय पब्लिकेशन्स)
  • अण्णा भाऊ सांगून गेले (विलास रणसुभे)
  • अण्णा भाऊ साठे (मराठी कवी) – लेखक: बजरंग कोरडे, अनुवाद : विलास गिते, प्रकाशन : साहित्य अकादमी
  • अण्णा भाऊ साठे (बालवाङ्मय, लेखक - बाबुराव गुरव)
  • अण्णा भाऊ साठे (हिंदी, प्रा. रतनलाल सोनग्रा)
  • अण्णा भाऊ साठे (डाॅ. संजीवनी सुनील पाटील)
  • अण्णा भाऊ साठे : चरित्र आणि कार्य – विजयकुमार जोखे, नालंदा प्रकाशन[१४]
  • अण्णा भाऊ साठे विचारधन (विठ्ठल साठे)
  • अण्णाभाऊ साठे व्यक्ती आणि वाङ्मय ( प्रा.डाॅ. अंबादास सगट)
  • अण्णा भाऊ साठेलिखित 'फकीरा'ची समीक्षा (डाॅ. श्रीपाल सबनीस)
  • क्रांतिकारी अण्णाभाऊ साठे (प्रा. गौतम निकम)
  • समाज सुधारक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे (संपादित, संपादक - ॲड. महेंद्र साठे)


👉 वि स खांडेकर यांनी साठेंबद्दल बोललेले महत्वाचे काही वाक्य 

      “अण्णा भाऊंच्या गोष्टींत अथवा लिखाणात विनोद नसतो, असं नाही; पण त्यांचा प्रकृतीधर्म आहे गंभीर लेखकाचा. ज्यांन फार भोगलं आहे, सात पडद्यांतून नव्हे, तर समोरासमोर जीवनातल्या क्रूर सत्याचं ज्याला दर्शन घडलं आहे. अशा पोटतिडकीने लिहणाऱ्या साहित्यिकाचा आत्मा त्यांना लाभला आहे. म्हणून साहजिकच त्यांच्या गोष्टी मोठ्या वैशिट्यपूर्ण असतात. म्हणून तत्कालीन सर्व बड्या कथाकारांपेक्षा ते निराळे आहेत. या लेखकाला प्रतिभेचे देणं लाभलं आहे. जीवनात आग ओकणाऱ्या हरतर्हेच्या गोष्टींच्या अनुभव त्यांच्या गाठी आहे. त्यांच्या मनात एकप्रकारचा पीळ आहे. ते अन्यायाविरुद्ध बंड उभारणाऱ्या वृत्तीचा पूजक आहे.”
                                         --- वि स खांडेकर

संकलन : श्री राठोड सुनिल नरसिंग
सौजन्य : गूगल व विकिपीडिया 


Post a Comment

0 Comments