पगारात बदल होणार, सुट्ट्याही वाढणार, या नव्या कायद्यामुळे नोकरदारांना ‘अच्छे दिन’..!

 

नव्या कामगार कायद्यामुळे नोकरदारांना ‘अच्छे दिन’..! पगारात होणार बदल, सुट्ट्याही वाढणार....





     👉म्हणजेच काय तर देशातील नोकरदार वर्गासाठी एक आनंदाची बातमी आहे..


👉 केंद्र सरकार यावर्षी नवा कामगार कायदा (New wage code) घेऊन येत आहे. 


👉या नवीन कामगार कायद्यात मोठ्या प्रमाणात बदल केले जाणार आहेत.. 


👉त्यामुळे नोकरदार वर्गाला खऱ्या अर्थाने ‘अच्छे दिन’ येणार असल्याचे बोलले जाते..


👉 केंद्र सरकार गेल्या वर्षभरापासून नवीन कामगार कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या तयारीत आहे. 


👉 राज्य सरकार मसुदा तयार करीत असल्याने आतापर्यंत या कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही. 


👉 हा कायदा या वर्षी लागू होणार असल्याची अपेक्षा आहे.

     

👉 केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्याच्या मसुद्यांवर सध्या चर्चा केली जात आहे. नवीन कामगार कायद्यात काही महत्वाचे बदल केले जाणार आहेत. 


👉 कामगार मंत्रालय वेतन संहितेबाबत सर्व क्षेत्रातील ‘एचआर’ प्रमुखांशी चर्चा करीत असल्याचेही सांगण्यात येत आहे 


हा कायदा लागू झाल्यास नोकरदार वर्गाचा काय फायदा होणार, कुठल्या बाबी वाढणार कोणत्या कमी होणार याबाबत जाणून घेऊ या..



👉👉हा कायदा लागू झाल्यास…👈👈



     👉 पगारी रजा वाढणार  आहेत : 

        संसदेत 2019 मध्येच नवीन कामगार संहिता मंजूर मिळाली आहे . त्यानुसार कामगार संहितेच्या नियमांत बदल करण्याबाबत कामगार मंत्रालय, कामगार संघटना व उद्योगांच्या प्रतिनिधींमध्ये अनेक तरतुदींवर चर्चा झालीय. 


👉यात नव्या नियमानुसार कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजा (पगारी रजा) 240 वरून 300 पर्यंत वाढवल्या जाऊ शकतात.


👉 यात पगार कमी होणार असल्याचे दिसते : 


◆उपरोक्त नवीन वेतन संहितेनुसार कर्मचाऱ्यांच्या पगार रचनेत मोठा बदल होणार आहे. 


◆कर्मचाऱ्यांचा ‘टेक होम’ पगार कमी होऊ शकतो. 


◆नव्या कायद्यानुसार, कर्मचाऱ्याचा मूळ पगार (Basic salary) कंपनीच्या ‘सीटीसी’ (CTC) खर्चाच्या 50 टक्क्यांपेक्षा कमी असू शकत नाही.


◆ सध्या अनेक कंपन्या मूळ पगार कमी करतात व जास्त भत्ते देतात. त्यामुळे कंपनीवरचा आर्थिक बोजा कमी होतो.


◆नवीन वेतन संहितेनुसार, कर्मचाऱ्यांचे भत्ते कोणत्याही परिस्थितीत एकूण पगाराच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त असू शकत नाहीत.


◆ समजा, एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार 50 हजार रुपये महिना असेल, तर त्याचा मूळ पगार 25000 रुपये व उर्वरित 25000 रुपये भत्त्यांमध्ये असावेत. असे या नवीन कायद्यात सांगितले आहेत .


👉👉आता आठवड्याला 48 तास काम 👈👈


मिळालेल्या माहितीनुसार प्रस्तावित कामगार संहितेत आठवड्यात 48 तास कामाचा नियम लागू होईल. 


◆काही संघटनांनी 12 तास काम आणि 3 दिवसांच्या सुट्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.


◆ त्यावर सरकारने स्पष्टीकरण दिले होते, की आठवड्यात 48 तास काम करावे लागेल.


◆ एखादा कर्मचारी रोज 8 तास काम करीत असेल, तर त्याला आठवड्यातून 6 दिवस काम व एक दिवस सुट्टी मिळेल.


  👉👉या कायद्यातून सामाजिक सुरक्षा👈👈


 ◆कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा कल्याण प्रणालीवरही काम केलं जात आहे. 


◆कार्यालयात काम करणाऱ्या नोकरदार, गिरण्या व कारखान्यांमधील कामगारांवरही या कायद्याचा परिणाम होणार असल्याचे सांगण्यात आले आहेत..


....तर हा नवीन कायदा खरोखरच कर्मच्याऱ्यांच्या फायद्याचं आहे का ? कंमेंट्स मध्ये लिहू शकता 


      


Post a Comment

0 Comments