रयतेच्या राजाला जाणलंच पाहिजे ,नव्हे ही तर काळाची गरजच ।।


   सुर्य नारायण जर उगवले नसते तर..
आकाशाचा रंगचं समजला नसता..
खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता.
 हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा' या एकाच ध्यासाने संपूर्ण जीवन व्यापलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत महत्वपूर्ण घटना आहे. असे म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याची तयारी ही महिना भरा पूर्वीपासून केली गेली.अनेक विद्वानांनी विविध प्रथा परंपरांचा अभ्यास केल्याचे पण राज्याभिषेक सोहळ्यासाठी अशी कोणतीच परंपरा वगैरे किंवा निराळी कुठलीच गोष्टी दिसून आल्या नाहीत.शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी देशातील कानाकोपऱ्यातून ब्राह्मण पंडितांना आमंत्रित केले गेले होते.असे काही इतिहासकार सांगतात की त्याकाळी महाराज्यांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी सर्वच मिळून लाखापेक्षा जास्त जणांचा जमाव जमला होता.रायगडाच्या पायथ्याशी आजूबाजुला व रायगडात त्यांना जवळपास सर्वांनाच चार महिने राहण्याची व रोजच्या मिष्ठांनाचे जेवण आदींची अद्भुत अशी व्यवस्था केली होती .
     सरदार राज्यातील  श्रीमंत गणमान्य व्यक्ती. दुसऱ्या राज्यांचे प्रतिनिधी,विदेशी व्यापार करणारे व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वच या सोहळ्याला उपस्थित झाले होते. प्रत्येक दिवशी एका धार्मिक विधीत आणि संस्कारात शिवाजी महाराज गढून गेले होते. राजे शिवाजी यांनी सर्वप्रथम आपली आई जिजाऊंना नमस्कार केला व  त्यांचे आशीर्वाद घेतले. असे म्हणतात की त्यानंतर महाराजांनी विविध मंदिरांत जाऊन देवर्शन केले. देवके दर्शन घेतले, पूजा केली आणि ते रायगडाला १२ मे १६७४ला परत आले. 
    महाराजांना तुळजापूर येथील भवानी मातेच्या दर्शनासाठी जाणे शक्य नव्हते. म्हणून चार दिवसांनी ते प्रतावगडावरील प्रतिष्ठापना केलेल्या भवानी माता देवीच्या दर्शनासाठी गेले होते. पुरातन काळातील पुस्तकातील दस्तावेजावरून  त्यावेळी सव्वा मण सोन्याची छत्री भवानी मातेस अर्पण केली गेली पुन्हा २१ मेला  रायगडावरील धार्मिक विधी उरकली . २८ मे ला  जानवे परिधान करून प्रायश्चित केले.  दोनर राण्यांबरोबर  विवाह विधी केला. त्यांनी गागाभट्ट यांना ७००० होन तर इतर सर्व ब्राह्मणांना मिळून तब्बल १७००० होन दक्षिणा दिली गेली.
     वरील सर्व विधी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी महाराजांची हिरे, जवाहर माणके, सोने ,चांदी ,शिसे जस्ट  कथिल आणि लोखंड अशा सात धातूंनी वेगवेगळी तुला करण्यात. आली शिवाय वस्त्र , कापूर , मीठ , खिळे , मसाले लोणी,  गुळ,  फळ फळावट इत्यादींच्या तुला करण्यात आल्या. 
तो दिवस उजाडला ६ जून १६७४ ला राज्याभिषेक सोहळा सुरू झाला. या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ केले गेले आपल्या पूर्वजांना स्मरून, राज्याभिषेक सुरू झाला. 
त्यावेळेस गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना आभूषणे अर्पण करण्यात आली सोबत महावस्त्रे  देण्यात आली. पण यावेळी शिवाजीमहाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान करून. गळ्यात फुलांच्या माळा घालून , राज्याभिषेकात राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होत्या .दोन फूट लांब दोन फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या मंचावर शिवाजी महाराज बसले होते, शेजारी उपरण्याला साडीचे टोक बांधलेली सोयराबाई दुसऱ्या मंचावर, तर बालसंभाजी राजे थोडेसे मागे बसले होते. 
 अष्टप्रधान गंगेसारख्या नद्यातून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते. त्यानंतर ते जलकुंभांनी शिवाजीमहाराजांबर अभिषेक केला. त्यावेळी मंत्रोच्चारण आणि आसमंतात विविध सुरवाद्य निनादत होते. सोळा सुवासनींना ओवाळनी नंतर शिवाजी महाराजांनी लालरंगाचे वस्त्र परिधान केले. जडजवाहिर, अलंकार परिधान केले.गळ्यात फुलांचे हार घातले. एक राज मुकुट घातला. आपल्या ढाल तलवार आणि धनुष्यबाण आदींची पूजा केली.मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात प्रवेश केला.
  तो क्षण रुबाबदार , व पाहणार्याचे डोळे दिपून जातील असा सोहळा राज्यभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार ३२ शकुन चिन्हांनी सजवलेले होते. 
ज्याप्रमाणे सभासद बखर  म्हणते त्याप्रमाणे ३२ मण सोन्याचे (त्यावेळेस चे १४ लाख रुपये मूल्य असलेले) भव्य सिंहासन सोन्याने मढवलेले होते.. शिवाजी महाराज सिंहासनावर आरुढ होताच. सोळा सवाष्णींनी त्यांना ओवाळले. ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्रांचे उच्चारण केले. प्रजेनी महाराजाना आशीर्वाद दिला. 
      ’शिवराज की जय’।।।।।। शिवराज की जय’ ।।।।।।च्या घोषणा दिल्या गेल्या. सोन्याचांदीचे फुले उधळली गेली. विविध ताल वाद्यांचा संगीताच्या सोबत जयघोषात आसमंत भरून गेले. तेवड्यात प्रत्येक गडावरून तोफा डागल्या गेल्या. 
      त्यातील मुख्य पुरोहित गागाभट्ट यांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवली आणि 'शिवछत्रपती’ म्हणून उच्चार केला. राजे शिवाजी महाराजांनी सर्व जनांना खूप धन भेट म्हणून दिले. असे म्हणतात की त्यांनी एकून सोळा प्रकारचे महादान केले. त्यानंतर विविध मंत्रिगणांनी सिंहासनापुढे जाऊन महाराजांना अभिवादन केले. छत्रपतींनी त्यांना या प्रसंगी विविध पदे, नियुक्तिपत्रे, धन, घोडे, हत्ती रत्ने, वस्त्रे,शस्त्रे  दान केली. असे म्हणतात हा सोहळा सकाळी आठ वाजेपर्यंत संपला.त्यानंतर , छत्रपती शिवाजी महाराज पहिल्यांदा एका देखण्या घोड्यावर स्वार होऊन जगदीश्वराच्या मंदिराकडे दर्शनासाठी गेले. 
      परत येताना तिकडून हत्तीवर स्वार होऊन त्यांची मिरवणूक रायगडावर निघाली. इतर दोन हत्तींवर जरीपटका आणि भगवा झेंडे घेऊन सेन्याचे प्रतिनिधी होते. सोबत अष्टप्रधान आणि इतर सैन्य होते. रायगडावर ही मिरवणूक जात असताना सामान्य जनांनी फुले, चुरमुर, उधळले, दिवे ओवाळले. रायगडावरील विविध मंदिरांचे दर्शन घेऊन महाराज महालात परतले. असा देखणा सोहळा पाहण्यासाठी ज्या डोळ्यात साठवून घेतलेले त्याकाळचे लोक खरंच खूप खूप भाग्यवान असा सोहळा पुन्हा भविष्यात होणे कल्पनाच म्हणावी लागेल .




          श्री सुनिल नरसिंग राठोड मुरूम 9763961999.

Post a Comment

0 Comments