शाहू महाराज जयंती निमित्त माहिती 2021 Marathi Wishes: छत्रपती शाहू ...

 


              राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज जयंती आहे यानिमित्ताने आज आपण त्यांच्या बद्दल माहिती मिळूयात .ब्रिटीश राजसत्तेमध्ये गोरगरिब जनतेला न्याय आणि हक्काची वागणूक मिळावी यासाठी ते नेहमी झटत होते.. त्याकाळतही पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते असणार्‍या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक स्तरावर काळाच्या एक पाऊल पुढे  विचार केल्याने आणि त्यानुसार समाजाची घडी बसवल्याने आजही जनसामान्यांमध्ये त्यांच्याबद्दल आदर आणि प्रेम कायम आहे.

Shahu Maharaj Jayanti 2021 Wishes:


छत्रपती  शाहू महाराज यांची ओळख त्यांच्या पुढील कार्यामुळे मिळाली ..


  •  26 जून 1874 साली जन्मलेल्या शाहू महाराज  दलित, बहुजन आणि मागासवर्गीयांना कायम साथ दिली.
  • दलित आणि बहुजनांचे कैवारी म्हणून आजही त्यांना मानेचे स्थान आहे. 
  • ब्रिटीश राजसत्तेमध्ये गोरगरिब जनतेला न्याय आणि हक्काची वागणूक मिळावी यासाठी ते नेहमी झटत होते
              कोल्हापूर (Kolhapur) संस्थानचे शाहू म्हणजेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज  (Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj) यांची  येत्या २६ जून रोजी जयंती आहे.  26 जून 1874 साली जन्मलेल्या शाहू महाराज  दलित, बहुजन आणि मागासवर्गीयांना कायम साथ दिली. त्यामुळे दलित आणि बहुजनांचे कैवारी म्हणून आजही त्यांना मानेचे स्थान आहे.  त्यांचा जन्म हा कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्याचं मूळ नाव यशवंत असे होते. कोल्हापूर संस्थानचे चौथे शिवाजी महाराज यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी 1884 झाली यशवंत यांना दत्तक घेतले आणि त्याचं नावं 'शाहू' असे ठेवले. पुढे त्यांच्या राज्याभिषेकानंतर 28 वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते.

Shahu Maharaj Jayanti 2021 Wishes:


१) समता, बंधुता यांची शिकवण देणारा
लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांनाजयंती 
निमित्त त्रिवार अभिवादन

२) भटक्या, विमुक्त जमातींचे आधारस्तंभ
छत्रपती राजर्षी शाहू महाराज
 यांच्याजयंती निमित्त अभिवादन!

३) बहुजन समाजाला स्वाभिमानाचे नवं जीवन देणार्‍या

लोकराजा  राजर्षी शाहू महाराज यांना मानाचा मुजरा!

Shahu Maharaj Jayanti 2021 Wishes:


                 आपणाला कल्पना असेलच कि छत्रपती  शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन दिले होते . अनेक शाळा आणि शैक्षणिक वसतीगृह सुरू केली होती . यासोबतच समाजात आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहास, विधवा विवाहाला परवानगी मिळवून दिली समाजात अस्पृश्यता कमी करण्यासाठी त्यांनी विशेष कार्य केले होते जे आजही टिकून आहे आणि त्याचा प्रभाव हा दिसतोच .

त्यांचा  पारंपारिक जातीभेदाला विरोध होता :

      छत्रपती  शाहू महाराजानी समतेवर आधारीत राज्य निर्माण केले होते . त्यामुळे जातीयवादी समाजकंटक लोकानी महाराजाना ठार मारण्याचे प्रयत्न केले होते . एकदा मारेकरी पाठवून आणि एकदा बाँब फेक करुन महाराजाना दगा करायचा प्रयत्न केला गेला होता . पण जनतेचे प्रेम आणि दुवा यांच्या पुण्याईने महाराज सुखरूप राहिले व त्यांचे प्राण वाचले . महाराजाना बदनाम करायचेही अनेक प्रयत्न झाले फोल ठरले .

                   अशा या महान राजाला मानाचा मुजरा व त्रिवार  विनम्र अभिवादन ! 


स्त्रोत : अंतरजाल व काही महत्वाचे संकेतस्थळ वरून  




Post a Comment

0 Comments